MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नशीब मी सुखरूप परतलो, तुमच्या मुख्यमंत्र्याला धन्यवाद द्या – मोदी.

apne cm ko thanks kehna

सुरक्षितेच्या कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबच्या फिरोझपूर मध्ये होणारी सभा रद्द करावी लागली. पंजाबच्या काँग्रेस सरकारने जाणून बुजून मोदींना सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप भाजप करत आहे.

दोन महिन्यानंतर पंजाबमध्ये निवडणुका आहेत. काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पार्टी जोरात प्रचार करत आहेत. भाजप मात्र मागे पडली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी फिरोझपूरला जात होते. तिथे त्यांची जाहीर सभा होती. मोदी सभेसाठी पंजाबला गेले होते पण शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा अडवला आणि त्यांना सभा रद्द करावी लागली. सभेला लागणारी सुरक्षितता देणे पंजाब सरकारची जबाबदारी होती ती त्यांनी पार पडली नसल्यामुळे मोदी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग यांच्यावर रागावले आहेत. भटिंडा विमानतळावर तशी त्यांनी भावना व्यक्त केली.

दोन वर्षानंतर मोदींची पहिलीच सभा.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंजाबमध्ये गेले नाहीत. मधल्या काळात शेतकरी आंदोलन सुरु झाले. पंजाबचे शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. पण सरकार त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देत नव्हते. कायदे मागे घ्यावे ही शेतकऱ्यांची मागणी मोदींनी नाकारली होती . एक वर्षभर शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करावे लागले. त्यामुळे मोदींच्या विरोधात पंजाबमध्ये चांगलेच जनमत तयार झाले आहे. पण मोदींनी १९ नोव्हेंबरला तीन कृषी कायदे मागे घेतले. कायदे मागे घेतल्यामुळे पंजाबमध्ये मोदींचा राग थोडा कमी झाल्याचा अंदाज होता. भाजपच्या सर्व्हेमध्ये तसे दिसत होते. त्यामुळेच मोदींनी कायदे मागे घेतल्याच्या दीड महिन्यानंतर फिरोझपूर मध्ये सभा आयोजित केली होती.

पंजाब सरकार करू शकली नाही मोदींची सुरक्षा

नरेंद्र मोदी फिरोझपूरच्या सभेसाठी हेलिकॅप्टरनेच जाणार होते. तसे त्यांच्या दौऱ्यांचे नियोजन होते पण पंजाबमध्ये वातावरण बदलेले होते..पाऊस आणि वारा वाढला होता. वातावरण चांगले नसल्यामुळे हेलीकॅप्टरने जाणे शक्य नव्हते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या चारचाकी ताफ्याने फिरोझपूरला जाण्याचा निर्णय केला. भटिंडा विमानतळावरून मोदींचा ताफा फिरोझपूरच्या दिशेने जात होता. वाटेत भटिंडा फिरोझपूरच्या मधल्या उडाण पुलावर शेतकरी मोदींचा विरोध करण्यासाठी थांबले होते. काळे झेंडे आणि निषेधाचे बॅनर त्यांच्या हातात होते. पंतप्रधान ज्या रस्त्याने जातात तिथे सामान्य नागरिकांना येण्याची परवानगी नसते. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तसे नियम आहेत. पण पंजाबमध्ये शेतकरी रस्त्यात आल्यामुळे मोदींचा ताफा थांबवायला लागला. सुरेक्षेमध्ये गफलत झाल्यामुळे मोदींना उडाण पुलावर वीस मिनिटे थांबावे लागले. नंतर सुरक्षेच्या दृष्टीने पंजाब सरकारच्या पोलीस विभागाने हमी न दिल्यामुळे मोदींना त्यांचा फिरोझपूर दौरा रद्द करावा लागला. मोदी त्या उडाण पुलावरूनच भटिंडा विमानतळावर परत आले. झालेल्या हलगरजीपणामुळे मोदी संतापले होते. आणि भटिंडा विमान तळावरच्या अधिकाऱ्यांना मोदी उपहासात्मक बोलले, “नशीब मी जिवंत परतलो, नाही तर देव जाणे काय होणार होतं. केलेल्या नियोजनासाठी तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्या.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.