MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

असं केलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांचं नियोजन.

spg security in india

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदींना रस्त्यातूनच परतावे लागले. नेमकी काय झाली होती पंतप्रधानांच्या सुरक्षितेत चूक ? जर अचानक पंतप्रधानांनी त्यांचा मार्ग बदला तर कोणाकडे असते पुढची जबाबदारी ?

४ जानेवारीला पंजाबच्या फिरोझपूरला जाताना पंतप्रधान मोदींना रस्त्यात २० मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधान ज्या रस्त्यावरुन जातात तिथून कोणालाही येण्याची परवानगी नसते. मात्र पंजाबमध्ये त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकार कडून चूक का झाली याचे उत्तर मागितले आहे.

पंतप्रधानाची सुरक्षा ठीक असल्याची परवानगी कोण देते ?

पंतप्रधानाचा दौरा ठरल्यावर त्यांच्या सुरक्षिततेची जबादारी केंद्रीय संस्था आणि ज्या राज्यात ते जात आहेत तेथील पोलीस मिळून बघत असतात. पंतप्रधानाच्या सुरक्षिततेसाठी नियम देखील बनवलेले आहेत. एस. पी. जी. ब्लू बुक त्याला म्हणतात. एस.पी. जी.(Special Protection Group) नावाचा पोलिसांचा ग्रुप पंतप्रधानांच्या सोबत असतो. त्यांच्याकडेच सगळी जबाबदारी असते. राज्याच्या पोलिसांकडून सगळी माहिती घेणे, ती दुसऱ्या केंद्रीय संस्थांकडून बरोबर आहे का हे बघणे आणि जर सगळी व्यवस्था ठीक असेल तर एस. पी. जी. चे अधिकारी सुरक्षेचा धोका नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाला कळवतात.

पंतप्रधान कुठे राहणार, कसे जाणार हे कसे ठरवले जाते ?

दौऱ्याला एस. पी. जी. अधिकाऱ्यांनी प्राथमिक परवानगी दिली कि दौरा पक्का होता. ज्या जिल्ह्यात दौरा आहे तिथल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख अधिकाऱ्याला तसे निरोप पाठवले जातात. मग पुढची जबादारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्याकडे जाते. पंतप्रधान कुठे उतरतील, कुठे त्यांच्या राहण्याची सोय होईल पासून पंतप्रधान त्यांच्या जिल्ह्यातून जाईपर्यंत सगळी व्यवस्था जिल्हा अधिकाऱ्यांना करावी लागते.

कोण कशासाठी जबादार असते ?

पंतप्रधानांसोबत काळ्या वेशातले एस. पी. जी. चे जवान तर नेहमीच असतात पण त्यांच्यावर फक्त पंतप्रधानाची सुरक्षा करण्याची जबादारी असते. पंतप्रधानाशिवाय बाकी जबाबदाऱ्या दुसऱ्या संस्थांमध्ये वाटून दिलेल्या असतात. जर पंतप्रधानाच्या जीवाला धोका असेल तर एस. पी. जी. अधिकाऱ्यांना आय. बी. कडून तसे आदेश दिले जातात. आय. बी. च्या आदेशानुसार एस पी जी. चे जवान पुढील कारवाई करतात. पंतप्रधानाच्या दौऱ्यावर लक्ष देणे, एस पी जी अधिकाऱ्यांना आदेश देणे आय बी चे काम असते. आय बी आणि एस. पी. जी. सोडून पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सुरक्षेची बाकी जबाबदारी राज्य पोलिसांवर असते.

अचानक नियोजन बदलले तर काय होते ?

पंतप्रधानाच्या दौऱ्याचे सुरक्षिततेचे नियोजन करताना नेहमीच जास्तीचे नियोजन केलेले असते. अचानक काहीही परिस्थिती उद्भवू शकते तशा शक्यतांचा विचार करून नियोजन केलेले असते. पण जर अचानक आणखी काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर एस.पी. जी., आयबी आणि राज्य सरकारचे अधिकारी मिळून नियोजन करतात. ह्या तीन संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले कि तसे पंतप्रधान कार्यालयाला कळवले जाते. आणि पंतप्रधान कार्यालयातून परवानगी मिळाली कि तसे नियोजन अमलात आणले जाते.

पंजाबमध्ये काय झाले ?

मोदींचा फिरोझपूरला दौरा होता. मोदी भटिंडा विमानतळावरून थेट फिरोझपूरला हेलिकॅप्टरने जाणार होते. सगळी व्यवस्था तिन्ही संस्थांनी केली होती. पण अचानक पंजाबमध्ये वातावरण बदलले. पावसाचे वातावरण झाले होते. अश्या वातारणात हेलिकॅप्टरने जाणे शक्य नसल्यामुळे भटिंडा मधून गाडीने जाण्याचा निर्णय घेतला गेला. केंद्रीय संस्था आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी तसे नियोजन केले होते. मात्र मोदी ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावर शेतकरी येऊन बसले होते. मोदींच्या विरोधात ते घोषण देत होते. शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे मोदींच्या गाड्यांचा ताफा परत फिरवावा लागला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.