राज्यात जो काही राजकीय नाच चालू आहे. तो बघून राज्यातली जनता तर खुश नाहीये. रोज कोणी तरी उठतो कोणावर तरी आरोप करतो , मग पोलीस चौकश्या त्याची हि कोठडी आणि ती कोठडी चालू होते. त्यात परत न्यूस चॅनेलवाल्यांचा राडा. असं वाटायला लागलं आहे कि महाराष्ट्रातले राजकारणी बिनकामाचे झालेत का ? कोणीही कामावर बोलायला तयार नाही. विकास कामे केली कि नाही याचा पत्ता नाही. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजप दोघेही तेवढ्याच पद्धतीने कंटाळवाणे राजकारण करत आहेत. पण मग प्रश्न पडतो महाराष्ट्रात असं का होत आहे. राज्यकर्ते असं एकमेकांत का झगडत आहेत.
तर त्याच कारण आहे. राज्यातली सत्ता. विरोधी पक्ष भाजपाला राज्यात परत त्यांची सत्ता आणायची आहे तर सत्ताधारी महाविकास आघाडीला काहीही करवून सत्ता टिकवायची आहे. ह्यासाठी ह्या दोघांमध्ये कोंबडी भांडण चालू आहे. राज्यात जे काही चालू आहे ते स्क्रिप्टेड आहे. त्यामागे भाजप आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातली परिस्थिती बिघडवायची आणि मग राष्ट्रपती राजवट लावायची असा त्यांचा प्लॅन असल्याचं संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत जे बोलले त्यात काही तथ्य आहे कि नाही ह्याचा आढावा आपण घेतला पाहिजे. संजय राऊत म्हण्तायएत तसं राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे शक्य आहे का आणि भाजपाची स्क्रिप्ट काय आहे हे देखील बघू.
भाजपचा प्लॅन काय आहे ?
सहाजिकच कोणताही पक्ष त्यांचा राजकीय कार्यक्रम/प्लॅन जाहीर करणार नाही. पण आपण बातम्या फॉलो केल्या तर आपल्या सहज लक्षात येईल कि भाजप ने काय प्लॅन केला आहे. तो प्लॅन असा आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष असून देखील भारतीय जनता पक्ष सध्या विरोधात आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार सुरु आहे. त्यामुळे हे सरकार जेवढया लवकर जाईल याची सोय भाजप करत आहे. सरकार तर पडायचे आहे पण कसे पाडणार ? या साठी भाजपाने राष्ट्रपती राजवट लावता येते का ह्याची चाचपणी करत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून , राज्य सरकार राज्य चालवण्यास सक्षम नसून राज्यात राष्ट्रपती शासन लावावे अशी भाजप राज्यपालांकडे मागणी करत आहे. पण राज्यात सर्व सुरळीत चालू असल्यास राज्यपाल कोणते कारण देऊन राष्ट्रपतीकडे पत्र पाठवणार कि राज्य शाशन कमजोर आहे म्हणून. हि राज्यपालांची अडचण आहे. त्यासाठी पण भाजपने स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे असं काही लोक म्हणत आहेत जी एकदम पद्धतशीरपणे पुढे चालली आहे.
भाजपच्या प्लॅनची सुरुवात झाली होती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपपासून. मुंबईचे डीजीपी परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आणि त्यातच अनिल देशमुख जेल मध्ये गेले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या नंतरच राज्यात राष्ट्रपती शाशन लागेल असं वाटत होत पण तेंव्हा लागलं नाही.
देशमुख यांच्या नंतर नंबर लागला नवाब मलिक यांचा. त्यांच्या जावयाला गांजा प्रकरणात जेल मध्ये टाकले होते. जावयाला जेल मध्ये टाकल्यामुळे नवाब मालिकांनी भाजप आणि मुख्यतः एनसीबी सोबत युद्ध सुरु केले होते. पण ते प्रकरण त्यांच्यावरच उलटले. दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपाखाली त्यांना जेल झाली आणि तेंव्हापासून नवाब मलिक जेल मध्ये आहेत. नवाब मलिक यांच्या प्रकरणात पण भाजपने राज्यपाल कोश्यारी यांच्या कडे राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती पण ती मान्य करण्यात नाही आली.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा प्लॅन फेल गेल्यावर भाजपने एसटी संपाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. एसटी संपाचा लीडर सदावर्ते याला भाजपने बॅकअप दिला. भाजपच्या बॅकअपचा तोटा असा झाला कि सदावर्ते सध्या जेल यामध्ये आहे. एसटी संपकऱ्यानी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला आणि त्याच प्रकरणात लीडर म्हणून सदावर्ते याना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते याना अटक झाल्यावर देखील भाजप राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघगडली असल्याचा प्रचार करत होती. सदावर्ते यांच्या नंतर भाजपच्या स्क्रिप्ट यामधील शेवटचा प्लँनपुढे आला तो म्हणजे राणा दाम्पत्य. राणा दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच भांडण घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होत. पण त्याचे परिणाम असे झाले कि मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते. शिवसैनिक मुंबईत रस्त्यावर उतरले होते. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून हे प्रकरण थोडंसं शांत केलं आहे. पण इथून पुढे राज्य नवा धडा सुरु होणार आहे. कसा ते सांगतो.
पुढे काय होणारेय ?
वर सांगितल्याप्रमाणे भाजपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. राज्यात कायद्याचे शासन नाही हे भाजपने राज्यपालांना सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या नंतर आता काय जे करणार ते राज्यपाल आणि केंद्रीय भाजप करणार आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पत्रकारांना म्हंटले आहेत कि राज्यातील जनतेला असं वाटत आहे कि राज्यात राष्ट्रपती शासन लावले पाहिजे. फडवणीस सध्या राज्य भाजपचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला एक किंमत आहे. फडवणीस राष्ट्रपती राजवटीचे भाष्य करत आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे कि सगळं ठरलं आहे. फक्त आपण वाट बघायची राज्यात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते.
महाविकास आघाडीची भूमिका काय असेल ?
जर राज्यपालांच्या सांगण्यावरून राष्ट्रपतींनीत्यांचं शासन लावले तर राज्य सरकारकडे कोणताही पर्याय नसणार आहे. तो निर्णय त्यांना मान्य करावा लागेल. याची जाणीव महाविकस आघाडी सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना आहे. त्यामुळेच काल राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे कि. राष्ट्रपती राजवट लावा मजा येईल म्हणून. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणले आहेत जर भाजपने राष्ट्रपती राजवट लावली तर जनतेचा उद्रेक होईल. शिवसेनेकडून संजय राऊत ह्या विषावर नेहमीच बोलत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी या विषयावर भाष्य केलं नाही.
सध्या जरी वाटत असल कि भाजप राष्ट्रपती राजवट लावेल पण ते कधी लागेल काही सांगता नाही. त्यामुळे आपल्याला त्याची वाट बघावी लागणार आहे. राज्यात जर राष्ट्रपती शासन लागले तर राज्यात परत निवडणूक घ्यावा लागतील. त्याचा खर्च राज्यातल्या जनतेच्या खिशातून घेतला जाईल.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !