युएपीए हा कायदा दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखला जातो. आसाम मधील अखिल गोगोई हे २०१९ पासून या कायद्यांतर्गत अटकेत आहे. नागरिकत्व कायद्याचा विरोधात आंदोलन केल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं. आरोग्याच्या समस्यांमुळे ते दवाखान्यात भरती होते. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इथे ते उपचार घेत आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करणे शक्य नव्हते. ४५ वर्षीय अखिल यांनी दवाखान्यातूनच उमेदवारी अर्ज भरला. स्वत: कुठलाही निवडणूक प्रचार न करता भाजपच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून अखिल गोगोईने विजय मिळविला आहे. पुढील पाच वर्षे सिबसागर विधानसभा मतदारसंघाचे ते आता प्रतिनिधीत्व करणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अखिल गोगई यांनी रैजोर दल या पक्षाची स्थापना केली होती. ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत. NRC CAA विरोधी आंदोलनात त्यांचा मुख्य सहभाग होता. परिणामी २०१९ पासून कारागृहात राहावं लागलं होतं. या निडणुकीत त्यांनी आसाम जाटिया परिषद (AJP ) या नवीनच स्थापन झालेल्या पक्षाशी हातमिळवणी केली. अखिल गोगोई हे प्रत्यक्ष प्रचारात नसले तरी त्यांचा प्रभाव प्रचंड होता. त्यांनी केलेल्या आजवरच्या कामाची हि एक पावतीच होती. सध्या अनेक राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला पण हा निकाल मात्र एकदम फिल्मी होता. चित्रपट पाहत असल्यासारखी आसाम मधील नागरिकांची अवस्थ असेल यात शंका नाही. हा निकाल नक्कीच प्रेरणादायी आहे.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार