विश्व कप स्पर्धा सुरु होण्याअगोदरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने T-२० चे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले होते. विराट कोहलीने कर्णधार पद सोडल्यानंतर साहजिकच अनुभव आणि प्रदर्शन पाहता कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माकडे येणार होती. विश्वकप स्पर्धेनंतर लगेचच रोहित शर्माने कर्णधार पद स्वीकारले आहे. त्याच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणाऱ्या T-२० स्पर्धेत होत आहे.
का सोडले विराट कोहलीने कर्णधार पद ?
दुबई आणि शारजाह मध्ये झालेल्या २०२१ च्या T-२० विश्व कप स्पर्धेमध्ये भारतीय संघ अपयशी ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सेमी फायनलला ही पोहचला नाही. विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या T-२०, एक दिवसीय आणि टेस्ट क्रिकेटचे कर्णधार पद होते. एक दिवसीय आणि टेस्ट क्रिकेट मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले होते. टेस्टमध्ये तर भारतीय संघ जगभरात एक नंबरवर आहे. परंतू विराट कोहली T-२० च्या प्रकारात संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. संघ विजयी होत नसल्याने विराट कोहलीवर कर्णधार पद सोडण्याचा चाहत्यांकडून दबाव होता आणि सोबत विराट कोहली ने सांगितले होते की त्याच्याकडे तिन्ही कर्णधारपद असल्याने तो त्याच्या खेळाला न्याय देऊ शकत नाहीये. ह्या सर्व कारणांमुळे विराट कोहलीने T-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला.
रोहित शर्माची नवी इंनिंग
रोहितसाठी कर्णधारपद नवे नाहीये. तो २०१३ पासून IPL (इंडियन प्रेमियर स्पर्धा ) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळा IPL चे विजेते पद जिंकले आहे . IPL चा अनुभव आणि रोहित भारतीय संघामध्ये ओपनर खेळाला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची इंनिंग रोहित साठी मजेदार असणार आहे. मुंबई इंडियन्सला ज्या पद्धतीने त्याने विजेते पद मिळवून दिले ते खूप कौतुकास्पद आहे. तसेच प्रदर्शन भारतीय संघाचा कर्णधार असताना तो करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
राहुल द्रविड नव्या भूमिकेत
विराट कोहलीने ज्या वेळेस T-२० संघाचे कर्णधार पद सोडले, सोबतच भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. रवी शास्त्री हे २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य कोच होते. रवी शास्त्री यांच्या नंतर राहुल द्रविडची भारतीय संघाचे नवे कोच म्हणून निवड झाली आहे. द्रविड रोहित शर्मा सोबतच पदभार स्वीकारणार आहेत.
राहुल द्रविड हे खूप संयमी खेळाडू होते. २००५ ते २०१७ च्या दरम्यान ते भारतीय संघाचे कर्णधार होते. राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघ २००७ चा एक दिवसीय विश्व कप देखील खेळाला आहे. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर राहुल द्रविड हे १९ वर्षा खालील संघाचे कोच होते. आता राहुल द्रविडचा या निमित्ताने नवा प्रवास सुरु होतो आहे.
शांत संयमी राहुल द्रविड, सोबतीला रोहित शर्मा पण खूप शांत आणि संयमी खेळाडू आहे. रोहित कर्णधार असताना बाकी खेळाडूंना खूप मदत करताना IPL स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. राहुल द्रविड आणि रोहित शर्माची यांची अनोखी जोडी भारतीय संघाला वेगळ्या उंची वर घेऊन जातील या बाबत कोणालाही शंका नाही.
न्यूझीलंड सोबत होणाऱ्या स्पर्धेत राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघ रोहित पर्वाची सुरुवात करतो आहे. भारतीय संघाला नव्या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा !
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !