२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप हरल्यापासून भारतीय संघात मोठी उलथापालथ होत आहेत. विराट कोहलीने टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. इंडियन टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आहे. बीसीसीआयने शास्त्रींना मुदतवाढ दिली नाही. राहुल द्रविडची भारतीय संघाचा नवीन कोच म्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयने वन डेच्या कर्णधार पदावरून कोहलीची हकालपट्टी केली आहे. रोहित शर्माकडे वन डे आणि टी-२० दोन्ही संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने भारतीय संघासाठी खूपच महत्वाचे ठरले आहेत.
भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेला तीन टेस्ट आणि तीन वन डे खेळण्यासाठी जात आहेत. रोहित शर्माने टेस्ट संघातून माघार घेतली आहे तर विराट कोहलीने वन डे खेळण्यास असमर्थता दर्शवली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेपण एकमेकांच्या कॅप्टन्सी मध्ये खेळण्यास अनुकूल दिसत नाहीत. भारतीय क्रिकेट मध्ये कॅप्टन्सी युद्ध सुरु झाले आहे.
भारत -न्यूझीलंड मालिकेपासून वादाला सुरुवात
टी-२० वर्ल्ड कप संपल्यावर लगेचच न्यूझीलंडची टीम भारतामधे टी-२० आणि टेस्टची मालिका खेळण्यासाठी आली. विराट कोहलीने राजीनामा दिल्यामुळे भारतीय टीमचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आली होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत पहिलीच मालिका खेळणार आहे. रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये होणाऱ्या पहिल्याच मालिकेमध्ये विराट कोहलीने खेळण्यास नकार दिला आणि तिथूनच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. टी-२० नंतर लगेच भारत न्यूझीलंडमध्ये टेस्टची मालिका सुरु झाली. मात्र रोहित शर्मा टेस्ट संघामध्ये नव्हता.
रोहित शर्मा वन डे कर्णधार झाल्यांनतर वाद चिघळला.
टी-२० कर्णधारपद सोडल्यावर विराट कोहली वन डे आणि टेस्टचा कर्णधार राहणार होता. बीसीसीआयने मात्र विराट कोहली कडून वनडे टीमच्या कर्णधार पदाचा राजीनामा घेतला. रोहित शर्माकडे टी-२० सोबत वन डे ची पण जबाबदारी दिली. विराट कोहलीला बीसीसीआय चा हा निर्णय अपेक्षित नव्हता. विराट कोहली बीसीसीआयच्या निर्णयावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. वन डे संघाचे कर्णधार पद काढून घेतळ्यामुळेच विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात वन डे सामने खेळण्यास नकार दिला आहे.
रोहित शर्माला दुखापत कि विराटच्या कॅप्टन्सीमध्ये खेळण्यास नकार ?
मुंबई मध्ये प्रॅक्टिस करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली. हाताला दुखापत झाली असल्याने मी टेस्ट सामने खेळू शकणार नाही असे रोहित शर्माने बीसीसीआयला कळवले आहे. रोहित शर्माने फक्त टेस्ट सामन्यांसाठी माघार घेतली आहे. १९ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या वन डे सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल. रोहित शर्मा फक्त टेस्ट सामने खेळणार नसल्याने वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तो दुखापत झाल्यामुळे खेळत नाही कि विराट कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये खेळायला तयार नाही या बद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेपण अनुभवी खेळाडू आहेत. विराट कोहली २०१७ पासून वन डे टीमचे कर्णधारपद सांभाळत आहे. विराट कोहलीला योग्य संधी मिळाली आहे त्यामुळे त्याने आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये खेळण्यास हरकत नसायला हवी. वर्ल्ड कप विजेता महेंद्र सिंग धोनी देखील २०१७ नंतर विराट कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये खेळाला आहे. २०२२ ला टी २० वर्ल्ड कप आहे आणि २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप येत आहे त्यामुळे भारतीय संघ एकसंघ असायला हवा. ही जबाबदारी विराट आणि रोहित शर्माने घ्यायला हवी आणि त्यांच्यातील हे शीत युद्ध संपून दोघांनी खिलाडू वृत्ती दाखवून देणे गरजेचे आहे.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !