देशात कोरोनाची दुसरी लाट भयानक होती. पण आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. महाराष्ट्रात आशादायक बातमी आहे. महाराष्ट्रासह पुणे मुंबई नागपूर येथील कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत आहे. शिवाय कोरोनामुक्त रुग्णाची संख्या देखील वाढत आहे. गेल्या महिन्याभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत अधिक आहे.
कोरोना रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात ३० हजारांच्या खाली.
महाराष्ट्रात जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा ४० हजारांच्या खाली आला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसातील आंकडा हा अजून खाली म्हणजे ३० हजाराच्या खाली गेला आहे. २१ मे रात्री उशिरा हाती आलेल्या आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नवीन २९,६४४ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी म्हणजे आज ४४,४९३ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ५५५ आहे तर आजतागायत ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३,६७,१२१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५५,२७,०९२ असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५०,७०,८०१ आहे. एकूण ३,२४,४१,७७६ लोकांनी आतापर्यन्त टेस्ट केली. घरीच विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाची संख्या २७,९४,४५७ आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांची संख्या २०,९४६ आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर ९१.७४ % तर मृत्यू दर १.५७ % आहे.
पुण्यात तीन अंकी रुग्ण संख्या
एकूण महाराष्ट्रानंतर मुख्य शहराचा विचार केला तर पुणे आणि मुंबई शहरातील रुग्णाची संख्या सतत कमी होताना दिसत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेत एकूण उपचार सुरु असणारे १३,४७९ आहेत. शुक्रवार २१ मे, २०२१ रोजी नवीन ९७३ रुग्णांची नोंद झाली तर बरे झालेल्या रुग्णाची संख्या यापेक्षा अधिक म्हणजे २,४९६ इतकी आहे. तर दिवसभरात ४१ मृत्यू झाले. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७,९९८ झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३,४७९ रुग्णांपैकी १३१५ रुग्ण गंभीर तर ४२७९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
मुंबई मध्ये सुद्धा सतत रुग्णांची संख्या कमी होत आहे
मुंबईमध्ये सुद्धा दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या कोरोना केसेस मध्ये मागच्या तीन-चार आठवड्यांपासून मोठी घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासातील आकडेवारीनं मुंबईकरांना अजून दिलासा दिला आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. २४ तासात मुंबईत १४१६ रुग्ण आढळले तर १७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मृतांची संख्या ५४ आहे तर एकूण मृतांची संख्या १४ हजार ५२२ झाली आहे. २९ हजार १०३ एकूण सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३ % आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३१७ दिवसांवर गेला आहे. तर १४ मे ते २० मे या काळात रुग्णवाढीचा दर ०.२२ % एवढा खाली गेला आहे.
राज्यात काल २० मे रोजी २९,९११ नवीन रुग्ण वाढले होते तर राज्यभरात ४७,३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. मृतांची एकूण संख्या ७३८ होती तर ३,८३,२५३ ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. कालच्या तुलनेत आज महाराष्ट्र आघाडीवर आहे. आशा करू या येणाऱ्या प्रत्येक दिवसात महाराष्ट्र रुग्ण संख्या घालवताना आघाडीवर असेल.
अजून ही लढाई संपली नाही आपल्याला सतर्क राहावे लागेल. काळजी महत्वाची आहे. सुरक्षित राहा
हे खास आपल्यासाठी
कोविडच्या काळात वरदान ठरलेल्या जम्बो हॉस्पिटलचा उगम ब्रिटिशांच्या काळात झालाय
पुणे शहरासाठी नवी नियमावली जाहीर काय सुरु, काय बंद ? (Pune lockdown guidelines today)
लसीकरण पॅकेज विकणाऱ्या हॉटेल वर कारवाई होणार (Hospital and hotel can not offer vaccination package)