नवाझुद्दीन सिद्दीकी नेहमीच सामाजिक प्रसंगांवर भूमिका घेत असतो. आजपर्यंत नवाझुद्दीन सिद्दीकीने वेळोवेळी आपली भूमिका जाहीर मांडली आहे. त्याने घेतलेल्या भूमिकेचं कधी कौतुक तर कधी टीका पण झाली आहे. यावेळेस नवाझुद्दीनने बॉलीवूडवरच हल्ला केला आहे.
एका स्पॉटबॉय बरोबर मुलाखतीत नवाझुद्दीन सिद्दीकी म्हणाला कि लोकांना खायला नसताना हे लोक पैसे उधळत आहेत. लोक मरत असताना हे मालदीवचे फोटो टाकत आहे. मालदीवचा तमाशा करून टाकला आहे असं देखील तो म्हणाला आहे. मनोरंजन क्षेत्रातील हे लोक कसे काय अशा वेळी असंवदेनशील राहू शकतात. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जात आहे. यावेळेस लोक दुःखात असताना मालदीव मध्ये फिरायला गेल्याचे फोटो टाकणे म्हणजे लोकांना टोमणे मारल्यासारखे आहे. हा सगळा प्रकार माणुसकी विसरत असल्याचे तो बोलला.
नवाझुद्दीन सिद्दीकीच्या या भूमिकेचं कौतुक होतं आहे.
पहिला लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर सिने अभेनेते आणि अभिनेत्रींनी मालदीवला जायला सुरवात केली. आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अशा अनेक अभिनेत्रींनी तर रिगच लावली. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. नवीन नियम आल्याबरोबर मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी पळ काढायला सुरवात केली. हे सगळे तेच सेलिब्रिटी आहेत जे लोकांना घरी राहायला सांगत आहेत. सामान्य लोकांना घरी राहिल्याशिवाय पर्याय नाही. पण सेलिब्रिटींना लॉकडाउन म्हणजे सहल करण्याची संधी आहे. थोडक्यात, या लोकांचा ढोंगीपणा उघड होत आहे.
नवाझुद्दीनच्या चित्रपटातील भूमिका नेहमी वास्तविक असतात. सॅक्रेड गेम्स मधील गायतोंडे विसरणं शक्य नाही. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बारिश कि जाये’ हे गाणं चांगलंच गाजत आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी चित्रपटातील अभिनय वास्तवात जगत असेल असं वाटतं, इतकी भूमिका तो चपखल करतो. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तो प्रामाणिक आणि संवेदनशील भूमिका घेतो.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !