संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कन्नमवार यांची आज जयंती आहे. पण ना कोठे त्यांच्या अभिवादनाचे पोस्टर दिसतेय, ना कोणी त्यांची आठवण काढतय . कन्नमवार यांचे काम महाराष्ट्र विसरला कि काय ?
आजच्या चंद्रपूर जिल्ह्यात जन्मलेले मारुतीराव कन्नमवार स्वातंत्र्य लढ्यात खूप कमी वयात सामील झाले. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या नेतृत्वात चाललेल्या काँग्रेस मध्ये त्यांनी काम केले. मिळेल ती जबाबदारी निभावत पुढे गेले. पुढे देश स्वतंत्र झाला आणि मारुतीराव कन्नमवार देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.आज मारुती कन्नमवार यांची आज १२२ वी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांचे जीवनकार्य समजून घेऊ .
कन्नमवार यांची मुख्यमंत्री होण्याआधीची कारकीर्द ..
१० जानेवारी १९०० ला कन्नमवार यांचा चंद्रपूर जिल्ह्यात जन्म झाला. बालपण खेड्यात गेल्यावर शिक्षणासाठी कन्नमवार नागपुरात आले. घरची गरिबी होती त्यामुळे घरून फारसे पैसे मिळत नसत. शहरात राहायला लागणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कन्नमवार मिळेल ते कामं करत. सकाळी घरो घरी पेपर टाकत. स्व खर्चातूनच कन्नमवार शिक्षण घेत होते. शिक्षणासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. पण सोबत देशात खूप महत्वाच्या घटना होत होत्या काँग्रेसची आंदोलने जोरात चालू होती. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्या नेतृत्वात देशभरात इंग्रजांना घालवण्यासाठी मोठा संघर्ष चालू होता. देशभरातले युवक काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. ह्या सगळ्या परिस्थितीत कन्नमवार मागे थोडी राहणार होते. नागपूरातूनच कन्नमवार यांनी काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. संघटनेसाठी लागणारे सर्व कामे कन्नमवार करत असत. त्यांच्या त्याच कामाची दखल घेऊन काँग्रेस नेतृत्वाने त्यांना मध्यप्रदेश काँग्रेसअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती.
यशवंतराव चव्हाणांना दिल्लीत जावं लागलं आणि कन्नमवार मुख्यमंत्री झाले.
१९६२ ला भारत चीन युद्ध झाले . दुर्दैवाने भारताला युद्धात हार पत्करावी लागली. युद्धात झालेल्या पराभवामुळे तत्कालीन रक्षामंत्री व्ही. पी. मेनन यांना राजीनामा द्यावा लागला. व्ही. पी. मेनन यांच्या नंतर रक्षा मंत्री पदासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवले. देश संकटात आहे तुमची देशाला गरज आहे म्हणून नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना गळ घातली. नेहरूंच्या आदेशानुसार यशवंतरावांनी रक्षामंत्री पद स्वीकारले. यशवंत चव्हाण दिल्लीत गेल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद खाली झाले होते.
संयुक्त महाराष्ट्र बनवताना विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही असे यशवंतराव चव्हाण यांनी शब्द दिला होता. विदर्भाला महाराष्ट्राचे नेतृत्व देण्याचे नागपूर करारामध्ये ठरले होते. यशवंतराव दिल्लीत जाणार असे पक्के झालं कि विदर्भाला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून मागणी वाढली. यशवंतराव चव्हाण देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विदर्भाचा व्हावा याच मताचे होते. विदर्भातून कोण मुख्यमंत्री होऊ शकेल याचा थोडा शोध घेतल्यावर मारुतीराव कन्नमवार यांचे नाव समोर आले. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या नावाला होकार दिला आणि मारुतीराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले.
कन्नमवार याना आपण विसरलो का ?
२४ नोव्हेंबर १९६२ ते २२ नोव्हेंबर १९६३ दरम्यान कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निधन झाले. एका वर्षाच्या कमी काळात पण कन्नमवार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा कारभार मराठीत चालवण्यासाठी कन्नमवर यांनी मंत्रालयात तसा विभाग बनवला. जनता दलाच्या काळात कोकण रेल्वे सुरु झाली मात्र त्याआधी १५ वर्ष कन्नमवर यांनी अभ्यास कमिटी बसवली होती त्याचा फायदा कोकण रेल्वे बनवताना झाला. यशवंतराव चव्हाण सारखा नेता महाराष्ट्रात नसताना कन्नमवार यांनी महाराष्ट्र यशस्वी सांभाळला.
आज कन्नमवार यांची जयंती आहे ना सरकारी जाहिरात दिसतेय ना कुठला नेता कन्नमवार याना अभिवादन करताना दिसत आहे, हे दुर्दैव आहे.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार