MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

काय आहे ही रझा अकादमी ज्याचा संबंध अमरावती दंगलीशी आहे(Raza academy Maharashtra)

अमरावतीच्या दंगलीनंतर रझा अकादमी परत एकदा चर्चेत आली आहे. संजय राऊत यांनी रझा अकादमी भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे तर भाजपाने अमरावतीच्या दंगलीसाठी रझा अकादमीला दोषी सांगितलंआहे (Raza academy news)

कशामुळे होत आहेत रझा अकादमी वर दंगलीचे आरोप ?

त्रिपुरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक दंगली झाल्या. त्रिपुराच्या दंगलीमध्ये मुस्लिम लोक दंगलीचे शिकार झाले. साहजिकच त्रिपुरा दंगलीचे पडसाद इतर राज्यांमध्ये पण पाहायला मिळणार होते. वेगवेगळ्या संघटनांनी दंगलीचा निषेध केला पण एवढ्यावर हे थांबलं नाही. महाराष्ट्रात मुबईतून काम करणाऱ्या रझा अकादमीने(Raza Academy Protest) त्रिपुरा दंगलीचा निषेध करण्यासाठी अमरावती शहरात मोर्चा आयोजित केला होता. परंतु अमरावतीमध्ये मोर्चाने हिंसक वळण घेतले. मोर्चात सामील लोकांनी भाजपा प्रतिनिधीच्या घरावर दगड फेक केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. तिथून दंगल पेटली असल्याचा संशय आहे. अमरावतीच्या दंगलीमध्ये कित्येक कोटीचे नुकसान झाले आहे. दंगलीत लोकांची दुकाने, घरे जाळली आहेत. निषेध मोर्चा रझा अकादमीने आयोजित केल्या कारणाने भाजपा रझा अकादमीवर दंगलीचा आरोप करत आहे.

काय आहे रझा अकादमी ? (What is raza Academy)

मुस्लिम “बरवेली” पंथाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने १९७८ साली मोहंमद सईद नुरी आणि इतर लोकांनी मिळून रझा अकादमी मुंबईत स्थापन केली. रझा अकादमीचे मुख्य उद्दिष्ट हे बरवेली पंथाचा प्रसार करण्यासोबत मुस्लिम साहित्य उपलब्ध करून देणे. त्यासाठी कार्यक्रम घेणे, लोकांना धर्माबाबत जागरूक करणे आणि मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार वाढवण्याचे काम करायचे. नंतरच्या काळात रझा अकादमी मोर्चे आणि इतर आंदोलनांमध्ये सहभागी होत असे किंवा आयोजित करत असे. २०१२ ला मुबईच्या आझाद मैदानात झालेल्या दंगलीत पण रझा अकादमी सहभाग असल्याचे आरोप झाले तेव्हापासून रझा अकादमी चर्चेत आहे.

रझा अकादमीचा वादाचा इतिहास

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी हे १९९९ साली मुंबई मध्ये येत होते त्या वेळेस रझा अकादमीने त्यांचे पुतळे जाळले होते. सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा जारी केला होता. सलमान रश्दी हे मुस्लिम विरोधी लिखाण करत असल्याचा आरोप रझा अकादमीने केला होता. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या विरोधात पण रझा अकादमी नेहमी आंदोलन करत असे. २०१५ साली ज्या वेळेस प्रेषित मोहंमद यांचे चित्र युरोपात काढल्यावरून वाद झाला त्या वेळेस पण रझा अकादमीने त्या विरोधात भारतभर निषेध, आंदोलने केली होती. २०१२ साली म्यानमार मध्ये मुसलमानांवर होत असलेल्या अत्त्याचाराविरोधात रझा अकादमीने आझाद मैदानात मोर्चा काढला होता त्यावेळेस दंगली घडल्या आणि त्यात ३ लोक आणि काही कोटींचे नुकसान झाले होते.

२०१२ नंतर आता २०२१ मध्ये परत रझा अकादमीवर दंगलीचा आरोप होत आहे. भाजपाचे लोक दंगल रझा अकादमीने सुरु केल्याचा आरोप करत आहेत तर शिवसेनेचे संजय राऊत भाजपा आणि रझा अकादमी मिळून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

-विष्णू बदाले

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.