२३ नोव्हेंबर २०१९ हा दिवस महारष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा बनला आहे. २०१९ च्या विधान सभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष सरकार बनवणार असं पक्क झाल्याचं दिसत होत. मात्र अचानक सकाळी सहाला बातमी येते अजित पवार आणि फडवणीस यांनी सरकार बनवल्याची. ह्या घटनेने अख्खा महाराष्ट्र आणि देश शॉकमध्ये होता. कोणालाही हे अपेक्षित नव्हतं. लोक झोपेतून उठायच्या आधी महाराष्ट्रात सरकार बनलं होत. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या बातम्या येत होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम शांतता होती. कोणालाही कसलाच अंदाज येत नव्हता. आज त्या ऐतिहासिक घट्नेलेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल
सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक लागल्या होत्या. फडणवीसांनी सत्तेत पाच वर्ष पूर्ण केली होती. शिवसेना भाजप सोबत सरकार मध्ये होती. मात्र त्याच्या विपरीत काँग्रेसची स्थिती नाजूक होती. लोक काँग्रेस सोडून जात होते. राष्ट्रवादीही फार चांगल्या अवस्थेत नव्हती. बरेच दिग्गज पक्ष सोडून गेले होते. राष्ट्रवादी कडून शरद पवार लढायला उतरले होते. प्रचंड शक्तीची भाजप सोबत शिवसेनेची ताकद आणि यांच्या विरोधात कमजोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी, अशी २०१९ च्या विधानसभेत लढत झाली होती. निवडणुकेचे परिणाम पण अपेक्षितच आले. भाजप महाराष्ट्र्रात एक नंबरचा पक्ष ठरला. १०५ आमदार भाजपचे निवडून आले होते. शिवसेनेचे प्रदर्शन पण चांगले होते, त्यांचे ५६ उमेदवार निवडून आले होते. भाजप -शिवसेनेचे सरकार परत सत्तेत आलं होत. लोकांनी फडवणीस -उद्धव ठाकरे यांना जनादेश दिला होता.परंतु सरकार बनवताना शिवसेना भाजप यांचे वाद उफाळून आले. मुख्यमंत्री पदावरून त्यांचं भांडण सुरु झाली होतं. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली. सरकार कोण बनवणार या कहाणीचा अंक इथून पुढे सुरु झाला.
महाविकास आघाडीला फडणवीस-अजित दादाचा धक्का !
भाजप मुख्यमंत्री पद देत नाही हे शिवसेनेला समजल्यावर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली. शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यात बोलण्या व्हायच्या.एक महिनाभर त्यांच्यात सरकार बनवण्यासाठी चर्चा, नियोजन चालू होत,
तिघे मिळून सरकार बनवणार ठरलं होत. आता महाराष्ट्रात महविकास आघाडीचं सरकार येणार असं वाटत होत. ह्या सगळया वेळेत भाजप आणि फडणवीस गायब दिसत होते. ते कुठल्याही बातम्यांमध्ये दिसत नसायचे. राज्यात राष्ट्रपतीं राजवट होती. २३ नोव्हेंबरच्या सकाळी पाच वाजता राष्ट्रपतींनी राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेतली आणि सकाळीच फडवणीस यांनी मख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वाना धक्का दिला.
दीड दिवसाच्या सरकारनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
जित पवार आणि फडवणीस यांनी सरकार स्थापन केलं खरं पण ते फक्त दिड दिवसच टिकलं. अजित पवार हे फक्त स्वतः आले होते राष्ट्रवादी पक्षाची भूमिका भाजप सोबत जाण्याची नव्हती.अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्याचा वयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार यांनी त्याच जाहीर केलं.अजित पवारांसोबत आमदार नसल्यामुळे फडणवीस यांचं सरकार टिकणार नव्हतं.साहजिकच फडवणीस यांनी दीड दिवसातच राज्यपालांना राजीनामा दिला.
फडणवीसांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा बोलण्या सुरु झाल्या. अजित पवार परत राष्ट्रवादी मध्ये आले. महाविकस आघडीची स्थापना झाली. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तर अजित पवार महाविकास आघाडी सरकार मध्ये पण उपमुख्यमंत्री निवडले गेले. काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात आणि इतरांची मंत्री म्हणून निवड झाली. दोन महिने चाललेल्या राजकीय नाटकाचा अंक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर संपला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मात्र हा राजकीय अंक मात्र कायमचा लिहला गेला.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !