मे २०२१ ला संपूर्ण देशाचं लक्ष बंगाल विधानसभा निकालाकडे लागलं होतं. सत्ताधारी टीएमसी जिंकणार कि भाजप बाजी मारणार यासाठी. सत्ताधारी टीएमसीने भाजपाला निकालात मात दिली. एकूण २९४ पैकी २१७ जागा जिंकत टीएमसीने त्यांची सत्ता कायम ठेवली.
निवडणुकीचे निकाल आल्यावर लगेच बंगाल मध्ये टीएमसी आणि भाजपच्या कार्यकत्यांमध्ये राडे झाले, अनेक ठिकाणी जाळ पोळ झाली अख्या बंगालमध्ये दंगलीचं वातावरण झालं होत. तेंव्हा भाजपचे नेते म्हणत होते कि ममता बॅनर्जी बंगालचा काश्मीर करतील.
काल २१ मार्चला बंगालच्या बिरभूम झिल्यात एक झुंडीने घरे पेटवून दिली त्या आगीत आठ लोकांचा होरपोळुन मृत्यू झाला. बंगालची शांतात भंग झाली आहे. त्यामुळे खर्च ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला काश्मीर केले आहे ह्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधले पाहिजे.
हिंसाचारामागील कारण काय ?
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बडसाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख टीएमसी नेता भादू शेख यांची काही अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली. भादू यांच्या मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संशयितांच्या घरांना आग लावली. या आगीत 8 जण जळाले असून मृतांमध्ये महिला आणि बालकांचा ही समावेश असल्याची माहिती आहे. द टेलिग्राफच्या बातमीनुसार मृतांमध्ये ,जहाँआरा ( ३८ वर्ष ) , लिली खातून (१८ वर्ष ) , शेली बीवी (३२ वर्ष ) ,नूरनेहर बीवी (५२ वर्ष ), रुपाली बीवी (३९), रहमान काजी (२२), तुला खातून (७ वर्ष ) मीना बीवी (४० वर्ष). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हिंसाचार राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण आहे.
आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून, या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. पोलीसही याला राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण असल्याचं म्हणत आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बंगाल मधील परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कमी पडल्या आहेत. त्यांमुळे त्यांच्यावर देशातून टीका होत आहे. सतीश आचार्य यांनी बंगालच्या हिसाचारावर त्यांचं कार्टून प्रसिद्ध केलं आहे.
बंगाल काश्मीर झाले कि नाही सांगता येणार नाही पण ममता बॅनर्जी यांना कायद्याच राज्य चालवण्यात अपयश नक्कीच आलं आहे. त्याची जबाबदारी त्या झटकू शकत नाहीत.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !