MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

चालू घडामोडी

एअर इंडिया टाटाची कंपनीची झाल्यामुळे विमानाची उडान भरतानाची सूचना बदलणार आहे. एअर इंडिया मधून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना,

'हॅलो,. हॅलो धिस इस युअर कॅप्टन स्पिकिंग , वेलकम तो टाटा एअर लाईन्स.' हि सूचना ऐकायला मिळणार आहे.

डॉ अनिल अवचट एका पेशात जगले नाहीत. ते गरीब लोकांचे प्रश्न मांडणारे पत्रकार होते, लोकांना व्यसनापासून दूर करणारे डॉक्टर होते. मनाची बाजू लिहणारे कवी होते, जगण्याची दिशा स्पष्ट करणारे साहित्यिक होते.
जब वी मेट हा बऱ्याच लोकांसाठी असा चित्रपट आहे कि लोक स्वतःच्या आयुष्याला यात जास्त...
महात्मा गांधी म्हणायचे विचाराशिवाय राजकारण होऊ शकत नाही . तुम्ही आता म्हणाल , राजकारणात कोणाला विचार आणि विचारधारा असते ? आज ह्या पार्टीत तर उद्या त्या पार्टीत हे सर्रास चालत कि. तर तुमचं खरंय. आजच्या राजकारणाकडे थोडं बारकाव्याने बघितलं कि असच दिसत. पैसे कमावणे हा एकमेव विचार शिल्लक राहिल्याचं वाटून जात. पण थांबा तुमचं लाल बावट्यावाले कार्यकर्त्यांबद्दल वाचायचं राहील आहे . आता हे लाल बावट्यावाले कोण तर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते . जे एकमेकांना कॉम्रेड म्हणतात . कॉम्रेडला शुद्ध मराठीत आपण सहकारी म्हणू शकतो .पण कॉम्रेड मध्ये जी क्रांती आहे,जो जोश आहे तो सहकारी शब्दात कुठे . त्यामुळे ते एकमेकांना कॉम्रेड अशीच हाक मारतात . तर असो कार्ल मार्क्सचे समाजवादी विचार घेऊन राज्य करायचं हे त्यांचं ध्येय . लेनिनने ती क्रांती रशियामध्ये करून दाखवली. पण इतर ठिकाणी जमली नाही . इतर ठिकाणी क्रांती यशस्वी झाली नसली तरी आम्ही ती एक दिवस नक्की करून दाखवू असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे क्रांती करायची असेल तर क्रांतीला पूरक वागावे लागेल, जनतेची कामे करावी लागतील ,सरकारच्या विरोधात संघर्ष करावा लागेल ह्यावर सर्व कॉम्रेडच एकमत आहे . सरकार आपल्या संघर्षची धार कमी करण्यासाठी आपल्याला कधी कधी पुरस्कार सुद्धा देऊ शकत त्यामुळे कॉम्रेड्सनी सरकारी पुरस्कार स्वीकारायचे नाही असा एक अलिखित नियम केला आहे. त्यामुळे कुठलाही कॉम्रेड सरकारी पुरस्कार स्वीकारत नाहीत.बुद्धदेब भट्टाचर्यांनी पण त्याच नियमाचे पालन करून पद्मभूषण नाकारला आहे. बाकी पक्षातले लोक कितीही पार्ट्या बदलू द्या पण लालबावट्यावाले विचार आणि विचारधारा सोडत नाहीत हे बुद्धदेब भट्टाचार्यानी दाखवून दिलय.
महारष्ट्राचं राजकारण तीन ठिकाणावरून चालतं ,एक शिक्षण संस्था ,दुसरं साखर कारखाने आणि तिसरं जिल्ह्याच्या सहकारी बँका.राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही ठिकाणी मजबूत आहेत.त्या प्रमाणात भाजप आणि शिवसेना कमजोर आहेत.ह्या पक्षांच्या नेत्यांकडे ना शिक्षण संस्था आहेत ना कारखाने.भाजपने डायरेक्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेतेच त्यांच्या पक्षामध्ये घेतले त्यामुळे त्यांना ह्या संस्थासाठी वेगळी मेहनत करावी लागली नाही.भाजपाकडे आपोआप बऱ्याच संस्था आल्या.शिवसेना मात्र या खेळात मागे पडली आहे .त्या मुळेच शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संस्था उभा करण्याचे आदेश दिलेत.
प्रत्येक जणांच्या आयुष्यात एक गुरु नक्की असतो.गुरु नसेल तर आपला आदर्श तरी असतोच असतोच.कोणाचा आदर्श...
आता अजून एक,शाश्वत विकासाच्या जाहीरनाम्यातील उदिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता हे एक उद्दिष्ट आहे. कारण प्राचीन काळापासून स्त्रिया कायमच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कायम होरपळत आहेत. इतिहासापासून कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान स्त्रियांना आजही समान अधिकार असल्याचे दिसत नाही.कारण एकविसाव्या शतकात ही 87.09% कुटुंब प्रमुख पुरुष आहेत आणि 12.88% स्त्री प्रमुख घरे आहेत. ज्याचा परिणाम अनेक बाबींतून पुढे येतात, ज्यामध्ये स्त्रियांविरुद्ध वाढता हिंसाचार हे स्त्रिया असमान, असल्याचं पाहिलं लक्षण आहे. विशेषतः वाढत्या घरेलु हिंसचाराचे प्रमाण. 15 ते 49 या वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या हिंसेमध्ये पती पत्नीच्या संबंधमधल्या हिंसेचे प्रमाणही बरेच मोठे आहे. परंतु अशा घटनांची नोंद खूप कमी प्रमाणावर होते आणि त्याला जबाबदार म्हणजे असक्षम स्त्री जिला समाजाने नेहमी कमजोर समजून मागे राहण्यास भाग पाडले. मागील टाळेबंदी च्या काळात तर घरेलु हिंसाचारमध्ये महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याचा क्रमांक पहिल्या पाच राज्यांमध्ये लागतो. स्त्री पुरुष असमानता फक्त आहे त्या पिढीला त्रासदायक आहे एवढेच नाही तर पुढच्या पिढीतील मुलामुलींना घरातील असमनातेला सामोरे जावे लागते. ज्याचा परिणाम घरातील स्त्री, मुलगी पुरूषी मानसिकतेला बळी पडून ती सक्षमते पासून कोसो दूर राहते. ही झाली सामाजिक असमानता.पण अशीच असमनता आर्थिक बाबिंतही पाहायला मिळते जसे की पुरुष कामगारांना महिला कामगारांपेक्षा त्याच कामासाठी 25% जास्त मोबदला मिळतो.जर ही परिस्थिती अशीच राहिली तर स्त्रिया कायम आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक रित्या दुर्बल राहतील. त्यामुळे अशा संरचनात्मक असमानतेचा प्रामुख्याने विचार करणे आणि त्यात अग्रणी बदल घडवणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही वाईट परिस्थितीत स्त्रियाना पुरुषांपेक्षा जास्त सहन करावे लागते.
तेलंगणाचे उद्योग मंत्री केटीआर यांनी एलोन मस्कला ट्विटर वरून तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मग महाराष्ट्राचे...

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.