MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आपली संपत्ती वाहन चालक आणि सहकाऱ्यांना देणारा शरद जोशी सारखा नेता महाराष्ट्रात झाला आहे.

Sharad Joshi Will

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशींनी आयुष्यभर शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि मृत्यूनंतर देखील आपली संपत्ती शेतकरी सहकाऱ्यांना आणि वाहन चालकाला दिली. मरण जवळ असतानाही ह्या नेत्याने शेतकऱ्यांचा विचार केला.

ज्यांना पण थोडीसी शेतीची पार्श्वभूमी आहे किंवा शेतीबद्दल सहानुभूती आहे त्या लोकांना शरद जोशींबद्दल सांगायची गरज नाही. जोशींनी शेतकऱ्यांना एकत्र केलं, लढायला शिकवलं, सरकारला भांडायला शिकवलं. संघटनेचा बिल्ला लावला कि शेतकरी कसे अगदी थाटात चालायचे. पोलीस असो नाहीतर नेता कोणालाही शेतकरी भिडायचे. शेतकरी संघटनेची तेवढी ताकद शरद जोशींनी बनवली होती.

जोशींना शेतीची पार्श्वभूमी नव्हती, तरीही शेतकऱ्यांचे नेते झाले.

आपल्याला तरी पटेल का, कि दुसऱ्या जातीतला,धर्मातला, व्यवसायातला माणूस आपला नेता आहे? तशी शक्यता आजच्या भारतामध्ये तरी दिसत नाही. पण शरद जोशींनी ते करून दाखवलं आहे. शेतीची काहीही पार्श्वभूमी नसताना ते शेतकऱ्यांचे नेते झाले. जर्मनीत भारतीय पोस्ट सेवेत जोशी अधिकारी होते. चांगली नोकरी असताना जोशीं भारतात आले. चाकणला शेती विकत घेतली. पाच सहा वर्ष शेती केली. शेतीतले प्रश्न समजून घेतले. शेतीचा अनुभव घेतल्यावर शरद जोशींनी शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी संघटना काढली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलने केली. उसाचा प्रश्न असो कि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा कापूस प्रश्न असो जोशी नेहमी लढायला तयार असायचे. कोकणातील असो कि मराठवाड्यातला सगळया शेतकऱ्यांनी शरद जोशींचे नेतृत्व मान्य केले होते. आपल्या मेहनतीने शरद जोशीने नेतृत्व कमावले होते. नेतृत्व करण्यासाठी त्या त्या जातीचे, धर्माचे किंवा त्या व्यवसायात असणे गरजेचे नसते फक्त लागते दिन दुबळ्यासाठी लढण्याची इच्छा आणि सामर्थ्य, हेच शरद जोशींनी सिद्ध केले.

मरताना संपत्तीचे वाटप देखील शेतकरी आणि सहकाऱ्यांना केले.

आपल्या भारतात नेते होतात पैसे कमावण्यासाठी किंवा पैसे असलेले लोकच नेते होतात. पण शरद जोशी सारखे लोक या सगळयांना अपवाद असतात. २०१५ ची गोस्ट आहे. शरद जोशींची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते आयुष्य जगत होते. त्यामुळे आपण मृत्यूपत्र बनवले पाहिजे आणि आपल्या संपत्तीचे वाटप केले पाहिजे असे जोशींना वाटले. जोशींनी वकिलांना बॊलवून मृत्यूपत्र बनवायला सांगितले. वकिलापासून त्यांच्या सोबत असलेल्या सर्व लोकांना वाटले होते जोशी त्यांची संपत्ती मुलींच्या नावे करतील पण जोशींनी सगळ्यांना धक्काच दिला. संपत्ती वाहन चालक बबन गायकवाड, सहकारी मित्र सुरेशचंद्र म्हात्रे आणि शेतकरी संघटना यांच्यात वाटून द्यावी असे वकिलाला सांगितले. शरद जोशींच्या सांगण्यावरून तसे त्यांचे मृत्यूपत्र बनवले गेले आणि २०१५ च्या डिसेंबर मध्ये जोशी गेल्यावर त्यांची संपत्ती वाहन चालक बबनराव गायकवाड, शेतकरी संघटना अन त्यांचे मित्र सुरेशचंद्रांना विभागून मिळाली.

आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आयुष्यभर झिजलेल्या शेतकरी संघटनेतील प्रियजनांना त्रास होऊ नये यासाठी सोय करणारे शरद जोशी सारखे नेते निराळेच असतात. वाहन चालकाचा सुद्धा विचार करणारे शरद जोशी नेते म्हणून तर यशस्वी आहेतच पण माणूस म्हणून त्यापेक्षा जास्त यशस्वी आहेत. आपले नशीब जोशी महाराष्ट्रात झाले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.